ग्रामीण भागात टेस्टींग व ट्रेसिंगची संख्या वाढवा – अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव

ग्रामीण भागात टेस्टींग व ट्रेसिंगची संख्या वाढवा – अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव Increase the number of testing and tracing in rural areas – Upper Collector Sanjeev Jadhav

पंढरपूर दि.21 – जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत टेस्टींग कराव्यात तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत-जास्त व्यक्तींचा शोध घेवून संस्थात्मक अलगीकरण करुन तात्काळ उपचार करावेत अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी करण्यात उपाययोजने बाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस प्रांताधिकारी सचिन ढोले,उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,तहसिलदार सुशिल बेल्हेकर,स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.पिसे,उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ अरविंद गिराम,पंढरपूर तालुका ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किरण अवचर,पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे ,पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार आदी उपस्थित होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जाधव म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन त्याची प्रभावीपणे अंमल बजावणी करावी.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण करुन तातडीने चाचणी कराव्यात. कोविड हॉस्पिटल बाहेर मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी असते. तेथेही चाचण्या घेण्यात याव्यात. ग्रामीण भागात रुग्ण वाढू नयेत यासाठी ग्रामस्तरावर जनजागृती करण्याची सूचनाही अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले व उदयसिंह भोसले यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली.

उपविभागीयअधिकारी विक्रम कदम यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.

ग्रामीण भागासह शहरात ही टेस्टींग व ट्रेसिंगची संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे कारण अनेक रुग्ण हे डॉक्टरांना आपल्या आजाराविषयी खोटी माहिती देत आहेत.त्यामुळे पूर्वीप्रमाणे एखाद्या भागात रूग्ण आढळून आल्यास त्या ठिकाणी तपासणी आणि थोडे कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: