IND vs SAF : ‘विराट कोहलीसह भारतीय खेळाडू या एका गोष्टीनंतर भरकटले आणि त्यांनी सामनाच सोडला..’
या घटनेनंतर भारतीय संघ भरकटताना दिसला आणि यादरम्यान संघाने खूप धावाही दिल्या. आणि चौथ्या दिवशी विरोधी संघाने २१२ धावांचे लक्ष्य सहज गाठले. आणि दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली.
भारतीय संघ जरा जास्तच भावूक झाला
भारताविरुद्धच्या मालिका विजयानंतर एल्गर म्हणाला की, “मला ते आवडले, कारण त्याचा दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला. कदाचित हा एक असा संघ होता, जे थोडे दडपणाखाली होते आणि गोष्टी त्यांच्याप्रमाणे होत नव्हत्या. कसोटी क्रिकेटमध्ये झालेल्या या प्रकारामुळे आम्हाला धावा करण्याची आणि लक्ष्याच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. भारतीय संघ खेळाबद्दल विसरून गेला आणि जरा जास्तच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. याचा आमच्या संघाला फायदा झाला आहे.
सेंच्युरियन येथे पहिली कसोटी ११३ धावांनी गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केले. जोहान्सबर्गमध्ये सात गडी राखून विजय मिळविल्यानंतर केपटाऊन मधील तिसऱ्या कसोटी सामन्यातही विजय साजरा करत मालिका आपल्या नावे केली.