कृत्रिम दूधात लाखो रुपये मिळवणार्‍या पांढऱ्या बोक्यांच्या टोळीवर कारवाई कधी ? – बळीराजा शेतकरी संघटना

कृत्रिम दूधात लाखो रुपये मिळवणार्‍या पांढऱ्या बोक्यांच्या टोळीवर कारवाई कधी ? – बळीराजा शेतकरी संघटना A group of white goats earning lakhs of rupees in artificial milk is gone – Baliraja Shetkari Sanghtna
 पंढरपूर /प्रतिनिधी - दुधातील होत असलेली भेसळ पूर्णपणे थांबले पाहिजे अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विधानभवनावर २६ जुलै २०२१ ला‌ मोर्चा काढण्यात येणार आहे.

  सर्वसामान्य नागरिकांचे पूर्णान्न किंवा सकस आहार म्हणून ओळखले जाणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करून कृत्रिम दूध तयार केले जात आहे.गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात अविभाज्य घटक असलेल्या दुधात तेल पामतेल दुधाची पावडर आणि मेलामाइन यासारखे विषारी रसायने मिसळून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा गोरख धंदा दूध संकलन करणाऱ्या मंडळींनी मांडला असल्याची चर्चा आहे. दुधात मोठ्या प्रमाणात विषारी पदार्थ मिसळून दररोज लाखो रुपये मिळवणारी आपल्या जिल्ह्यात अशा पांढऱ्या बोक्यांची टोळीच माजली असल्याचे धक्कादायक चित्र समोर शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून दूध उत्पादक करीत आहेत परंतु गेल्या काही वर्षापासून जिल्हा दूध संघाच्या बरोबर इतर खाजगी संस्था सोलापूर जिल्ह्यामध्ये दूध संकलन , दूध प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे दुधाच्या या गुणवत्तेवर आणि विश्वासार्हतवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे  जिल्ह्यात लाखो लिटर दुधाचे संकलन होत असल्याने ही गेल्या काही वर्षातील अन्नभेसळ विभागाची कोणतीही कारवाई न झाल्याचे सर्वकाही अलबेल गोलमाल आहे हे नक्की सांगता येत नाही. दुधात सध्या युरिया दूधाची पावडर आणि अन्य आरोग्य सार्थक आरोग्यास घातक रसायने मिसळून दुधाचा गोरखधंदा मांडलेल्या पांढरपेशा बोक्यावर प्रशासनाने करडी नजर ठेवून दुधात भेसळ होणार नाही याकडे अन्नभेसळ प्रशासनाने लक्ष देणे खूप आवश्यक बनले आहे. गेल्या काही महिन्यापासून दुधात भेसळ करण्याचा धंदा जिल्ह्यात तेजीत असल्याची चर्चा आहे.सध्या दूध भेसळ करण्याचे प्रमाण आणि संबंधित प्रशासनाने केलेल्या कारवाईकडे पाहता हा गोरखधंदा प्रशासनाच्या वरदहस्ताने तरी सुरू नाही ना असा प्रश्न आत्ता सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.अन्न व औषध प्रशासनाने दुधाच्या शुद्धतेवर लक्ष ठेवून सामान्य लोकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवावा आणि दररोज दुधात हजारो लिटर भेसळ करून त्यातून लाखो रुपये मिळवून स्वतःचे उखळ पांढरे करणार्‍या टोळीच्या मुसक्या अवळाव्यात , प्रशासनाने 15 दिवसात कारवाई करावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विधानभवनावर 26 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे असे निवेदन देण्यात आले.  

हे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री वाघमारे यांना बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष ‌ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले व जिल्हा उपाध्यक्ष रामदास खराडे,सुजय मोटे, औदुंबर सुतार, तानाजी सोनवले,रामेश्वर झांबरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: