तानाजी सावंत आता कळालं का, कोण आदित्य ठाकरे? मुंबईच्या माजी महापौरांनी डिवचलं
विश्वनाथ महाडेश्वर काय म्हणाले?
तानाजी सावंत आता कळालं का कोण आदित्य ठाकरे? तुमच्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७ पैकी ७ ही जागा ज्यांच्या पक्षाने जिंकल्या आहेत त्या पक्षाचे नेते हेच ते आदित्य ठाकरे आहेत, असा टोला महाडेश्वर यांनी लगावला आहे.
लढली… हरली… अन् रडायलाच लागली… अंशु मलिकला रौप्यपदक, फक्त दोन गुणांनी सुवर्ण हुकले
दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेला यश
दक्षिण सोलापूरमधील चिंचपूर येथील ग्रामपंचायतवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून भाजपाचा धुव्वा उडविला आहे.७ पैकी ७ जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत ,या निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमर पाटील गटाचा विजय झाला आहे. जय हनुमान विकास पॅनल या गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीत विजय नोंदविला आहे.यामध्ये संगव्वा बगले,सचिन चडचन,संगव्वा हत्तरसंग,सविता साबळे,गुरव्वा बनसोडे,गौराबाई हत्तरसंग,शंकर साबळे हे सात उमेदवार विजयी झाले आहेत.
Gold Medal For India…बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक, राष्ट्रकुलमध्ये ऐतिहासिक कामगिरी
तानाजी सावंत काय म्हणाले होते?
शिवसंवाद यात्रेच्या संदर्भानं बोलताना आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे. आमची सगळी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकही शिवसैनिक त्यांच्या पाठिशी राहिलेला नाही. आदित्य ठाकरे हे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले होते. सावंत यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.
कुस्तीमध्ये भारताला सलग दुसरे सुवर्णपदक, बजरंगनंतर साक्षी मलिकने मारली बाजी