दक्षिण महाराष्ट्रातील सहा कारखाने रेड झोनमध्ये; काय आहे कारण?
करोनाची तिसरी लाट टळली?; मुंबईतील आकडे दिलासादायक
देशातील कारखान्यांनी अठरा हजार कोटींचा एफआरपी बुडविला आहे. तो वसूल करण्यासाठी विविध शेतकरी संघटना आंदोलनाच्या भूमिकेत आहे. महाराष्ट्रातील २७ कारखान्यांचाही यामध्ये समावेश आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तेरा, सांगलीतील दोन तर सातारा जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे. केवळ ५७ कारखान्यांनी वेळेत तर उर्वरित कारखान्यांनी उशिरा का होईना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम दिली. साखरेचे दर वाढल्याने हा एफआरपी देणे शक्य झाले. पण अनेक कारखान्यांनी एफआरपी बुडविल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे पुन्हा नव्या हंगामात अशी फसवणूक होवू नये म्हणून सरकारने जाहीर केलेली कारखान्यांची आर्थिक कुंडली उपयोगी पडणार आहे.
पंकजा मुंडे यांना धक्का; कारखान्याच्या उपाध्यक्षांसह ५ संचालक राष्ट्रवादीत
शेतकऱ्यांना कोणत्या कारखान्यांना ऊसाचा पुरवठा करावा हे शेतकऱ्यांना सुलभ जावे, त्यांची आर्थिक फसवणूक होवू नये, ऊस घातल्यानंतर आपल्या हक्काच्या पैशासाठी त्यांना आंदोलन करण्याची वेळ येवू नये म्हणून राज्यातील प्रत्येक कारखान्याची माहीती देण्यात आली आहे. यानुसार शेतकऱ्यांनी ऊस घातल्यास त्यांना नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
शेखर गायकवाड, साखर आयुक्त
राज्यातील एकूण कारखाने १९०
वेळेवर एफआरपी देणारे ५७
एफआरपी न देणारे २७
सांगली २
सातारा ४
सोलापूर १३
पुणे २