IPL मधून या खेळाडूंना लागणार टी-२० वर्ल्डकपचा ‘जॅकपॉट’


शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामानंतर लगेच टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. सर्व देशांनी संघांची घोषणा केली आहे. पण आयसीसीने संघ बदलण्याची मदत १० ऑक्टोबरपर्यंत दिली आहे. यामुळे सर्व संघांना खेळाडू बदलण्याची संधी आहे. यामुळे सध्या आयपीएल खेळणाऱ्या काही खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

वाचा- IPL मध्ये आज द्विशतकचा इतिहास घडणार, या खेळाडूच्या नावावर होणार विक्रम

युएईमध्ये आयपीएल २०२१चे दुसरे सत्र सुरू आहे आणि तेथेच टी-२० वर्ल्डकप होणार आहे. या दुसऱ्या सत्रात ज्यांनी दमदार कामगिरी केली आहे त्यांना वर्ल्डकप संघात स्थान मिळू शकते. ज्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे त्यांना संघात घेण्यावर निवड समिती विचार करू शकते. यामुळेच सर्व चाहत्यांना १० ऑक्टोबरची उत्सुकता लागली आहे. जाणून घेऊयात असे कोणते खेळाडू आहेत ज्यांचा संघात घेण्यावर विचार केला जाऊ शकतो.

शिखर धवन आणि श्रेयस अय्यर- या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. यामुळे भारतीय निवड समिती श्रेयसचा १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डपक संघात अंतिम १५ मध्ये स्थान देऊ शकतील. खासकरून जेव्हा सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे दोन्ही फलंदाज खराब फॉर्ममध्ये आहेत. तेव्हा धवन आणि अय्यरचा विचार केला जाऊ शकतो. धवनने ४००हून अधिक धावा केल्या आहेत. सध्या भारतीय संघात रोहित शर्मा सोबत विराट कोहली किंवा केएल राहुलचा विचार केला जात आहे.

वाचा- मुंबई इंडियन्सच्या कोचने केली हार्दिक पंड्याची पोल खोल, उपस्थित केले गंभीर प्रश्न

युजवेंद्र चहर आणि शार्दुल ठाकूर-
जेव्हा भारताने टी-२० संघ जाहीर झाला तेव्हा सर्वांना धक्का बसला होता. कारण युजवेंद्र चहल याचा विचार करण्यात आला नव्हता. त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. पण निवड समितीने त्याचा विचार केला नाही. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या बाजूला राहुल चाहरची बातमी फार साधानकारक झालेली नाही.

दुसऱ्या बाजूला निवड समितीने शार्दूल ठाकूरला राखीव खेळाडू म्हणून निवडले आहे. पण त्याने आयपीएलमधील कामगिरीवरून हे दाखवून दिले आहे की तो वर्ल्डकपमध्ये महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. दुसऱ्या टप्प्यात शार्दुलने ६ विकेट घेतल्या आहेत. संघात निवड झालेल्या हार्दिकने गेल्या सामन्यात ४० धावा केल्या असल्या तरी तो अद्याप गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे शार्दूलचा संघात समावेश होऊ शकतो.

वाचा- MI vs DC: आज पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात येतील का? असे आहे गणित

फाफ डु प्लेसीस, जेसन होल्डर आणि सुनील नारायण-भारतीय संघ सोडून अन्य देशातील काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. यात दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिसने त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहेत. तो राष्ट्रीय संघात आणखी योगदान देऊ शकतो. त्याची राष्ट्रीय संघात निवड झालेली नाही. त्यामुळे आफ्रिकेची निवड समिती त्याचा पुन्हा विचार करू शकते.

वेस्ट इंडिजच्या सुनीलने कधी विचार देखील केला नसेल की त्याला संघातून बाहेर केले जाईल. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात त्याने कमालीची गोलंदाजी केली आहे. दुबईच्या मैदानावर त्याने फलंदाजांना अडचणी आणले आहे. यामुळे वेस्ट इंडिजची निवड समिती त्याचा विचार करू शकते.

वाचा- IPLच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम धोक्यात; या खेळाडूकडे सुवर्ण संधी

जेसन होल्डर खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खराब झाली असली तरी होल्डने मात्र शानदार खेळ केला आहे. वेस्ट इंडिज संघात त्याला स्थान मिळाले नाही. सीपीएलमध्ये पाच विकेट घेणाऱ्या होल्डरने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात कामल केली. त्याने ६ विकेट घेतल्या तर एका सामन्यात ४७ धावा केल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: