MI vs DC IPL 2021: मुंबईचे फलंदाज पुन्हा अपयश; दिल्ली समोर १३० धावांचे आव्हान


शारजाह: गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी आयपीएलच्या १४व्या हंगामात अतिशय खराब झाली आहे. साखळी फेरीतील करो वा मरोच्या लढतीत दिल्ली विरुद्ध मुंबईने २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या. या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा- MI vs DC: आज पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात येतील का? असे आहे गणित

दिल्लीविरुद्धच्या लढती मुंबई इंडियन्सने संघात एक बदल केला. फिरकीपटू राहुल चाहरच्या जागी जयंत यादवला संधी दिली. मुंबईच्या डावाची सुरूवात कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी केली. पण मुंबईला पहिला धक्का बसला जेव्हा आवेश खानने रोहितला फक्त ७ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने डी कॉक सोबत चांगली भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. ही जोडी संघाला सावरेल असे वाटत असताना अक्षर पटेलने डी कॉकला १९ धावांवर माघारी पाठवले.

वाचा- IPL मध्ये आज द्विशतकचा इतिहास घडणार, या खेळाडूच्या नावावर होणार विक्रम

डी कॉकच्या जागी आलेल्या सौरभने सूर्यकुमार सोबत संघाला अर्धशतक करून दिले. ही जोडी अक्षर पटेल फोडली, त्याने सूर्यकुमारला बाद केले. त्याने २६ चेंडूत ३३ धावा केल्या. यामुळे मुंबईचा अवस्था १०.३ षटकात ३ बाद ६८ अशी झाली होती.

वाचा- ‘ओ, हसीन जुल्फों वाली’; शतक केल्यानंतर स्मृतीचे केले असे कौतुक

चांगल्या फॉर्ममध्ये असलेला सौरभ तिवारी संघाला अडचणीतून बाहेर काढेल असे वाटले. पण तो देखील १५ धावांवर बाद झाला. त्याला अक्षरनेच बाद केले. तिवारी पाठोपाठ धोकादायक कायरन पोलार्डला नॉर्जेने ६ धावांवर बाद केले. मुंबईचा निम्मा संघ ८७ धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. मैदानात असलेले पंड्या बंधू काही तरी कमाल करतील असे वाटले होते. पण हार्दिक १७ धावांवर बाद झाला. त्याला आवेशने बाद केले. त्याच षटकात आवेशने कुल्टर नाईलला बाद करून मुंबईला सातवा धक्का दिला.

वाचा- मुंबई इंडियन्सच्या कोचने केली हार्दिक पंड्याची पोल खोल, उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिल्लीकडून अक्षर पटेलने ४ षटकात २१ धावात ३ विकेट घेतल्या. आवेश खानने १५ धावात ३ विकेट घेतल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: