आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबच्या संघाला बसला अजून एक धक्का, पाहा नेमकं घडलं तरी काय…


शारजा : पंजाबच्या संघाला आज आरसीबीविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात पारभव पत्करावा लागला. या पराभवानंतर आता पंजाबच्या संघाला अजून एक धक्का बसला आहे.

पंजाबच्या संघाचे आता १३ सामने झाले आहेत. या १३ सामन्यांमध्ये पाच विजय त्यांनी मिळवले आहेत, तर आठ पराभव त्यांच्या पदरी पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात १० गुण असून ते पाचव्या स्थानावर आहे. पण प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आता नशिबावरच अवलंबून राहावे लागणार आहे. कारण आता पंजाबचा संघ अखेरचा साखळी सामना जिंकला तरी त्यांचे १२ गुण होतील आणि प्ले-ऑफसाठी ते पात्र ठरू शकणार नाहीत. पण मुंबई इंडियन्स, केकेआर आणि राजस्थआन हे तिन्ही संघ सध्याच्या घडीला प्रत्येकी १० गुणांवर आहेत. त्यामुळे या संघांनी जर सामने गमावले तर पंजाबच्या संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचता येणार आहे, अन्यथा त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

आरसीबीचा संघ हा पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता, आजच्या सामन्यानंतरही आरसीबीमध्ये कोणताही फरक पडलेला पाहायला मिळाला नाही, कारण आरसीबीचा संघ अजूही तिसऱ्याच स्थानावर आहे. आजच्या सामन्यातील विजयासह आरसीबीचे १६ गुण झाले आहेत आणि त्यांनी प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता आरसीबीच्या संघाला साखळी सामन्यांमध्ये जास्त काळजी करायची गरज नाही. त्यामुळे चेन्नई, दिल्लीपाठोपाठ आरसीबीचा तिसरा संघ हा प्ले-ऑफसाठी निश्चित झाला आहे.

आरसीबीच्या संघाने आज नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ग्लेन मॅक्सवेलने तो योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण मॅक्सवेलने आजच्या सामन्यातही धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. आरसीबीच्या संघाला देवदत्त पडीक्कलने चांगली सुरुवात करून दिली, पण ४० धावांवर तो बाद झाला. त्यावेळी आरसीबीच्या संघाची संपूर्ण जबाबदारी मॅक्सवेलने आपल्या खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेलने यावेळी ३३ चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावा फटकावल्या, त्यामुळेच आरसीबीच्या संघाला पंजाबपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवता आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: