lakhimpur kheri violence : ममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा; म्हणाल्या, ‘यूपीत ‘राम राज्य’ नव्हे, तर ‘किलिंग राज्य”
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यापूर्वी लखीमपूर खिरीच्या तिकोनिया भागात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळून आला. यात चार शेतकऱ्यांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झालला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलन करणाऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप आहे. यानंतर पोलिसांनी अजय मिश्रा यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
लखीमपूर हिंसाचारप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले…
दरम्यान, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हिसांचार प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच घटनेतील मृत ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचंही आश्वासन दिलं आहे.