lakhimpur kheri violence : लखीमपूर प्रकरणी योगी सरकारचा मोठा निर्णय; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ४५ लाखांची मदत जाहीर
‘हिंसाचाराला राकेश टिकैत कारणीभूत’
लखीमपूर खीरी हिंसाचारावर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपला मुलगा घटनेवेळी उपस्थित नव्हता. तसंच या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी मिश्रा यांनी केली आहे.
Lakhimpur violence: ‘मला सोडा, जाऊ द्या…’, लखीमपूर हिंसाचारात मंत्र्यांच्या ड्रायव्हरचा नाहक बळी?
या हिंसाचाराला भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे जबाबदार आहेत. मुलगा आणि आपण त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हतो. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. यातून सत्य सर्वांसमोर येईल. हिंसाचारात आमच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनाही भरपाई मिळायला हवी. या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणं झालं आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं केंद्रीय मंत्री अजय मिश्रा म्हणाले. हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करण्याची मागणीही केंद्रीय मंत्री मिश्रा यांनी केली आहे.
Lakhimpur Kheri violence: ‘मी फक्त मंत्री-खासदार नाही’ म्हणणाऱ्या अजय मिश्र यांची खरी ओळख