Priyanka Gandhi: ‘अटकच बेकायदेशीर, बेल बॉन्ड का भरावा?’, प्रियांका गांधींचा प्रश्न


हायलाइट्स:

  • एफआयआर उपलब्ध करून देण्यात आली नाही : प्रियांका गांधी
  • ‘वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला’
  • राहुल गांधी आज लखीमपूरला भेट देणार?

नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचारानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना सीतापूरमध्ये रोखण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर प्रियांका गांधी यांच्यावर शांतीभंग करण्याचा आणि कलम १४४ च्या उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबतच राज्यसभा खासदार दिपेंद्र हुड्डा आणि उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासहीत ११ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीय.

प्रियांका गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी आपल्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बेल बॉन्ड भरण्यास नकार दिला आहे. प्रियांका गांधी यांनी प्रशासनानं कायद्याचं उल्लंघन करत आल्याला कैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे.

‘ज्यावेळी मला ताब्यात घेण्यात आलं तेव्हा मी सीतापूर जिल्ह्यात होते. माझ्या माहितीनुसार, सीतापूर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलेलं नव्हतं. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत तर मला हेदेखील सांगण्यात आलं नव्हतं की कोणत्या कारणामुळे मला ताब्यात ठेवण्यात आलं आहे. तसंच कोणत्या कलमांखाली मला अटक करण्यात आली, याची माहितीही मला देण्यात आली नव्हती’, असा खुलासा प्रियांका गांधी यांनी केला आहे.

‘माझ्या अटकेशी संबंधीत मला कोणतीही नोटीस किंवा आदेश दाखवण्यात आला नाही. मला कोणतीही एफआयआर उपलब्ध करून देण्यात आली नाही. माझे वकील सकाळपासून गेटबाहेर उभे आहेत. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी माझ्या वकिलांची भेट घेण्याच्या अधिकारापासूनही मला वंचित ठेवण्यात आलं’, असं सांगत आपली अटकच बेकायदेशीर असल्यानं बेल बॉन्ड भरणार नसल्याचा पवित्रा प्रियांका गांधी यांनी घेतलाय.

Lakhimpur Violence: लखीमपूर हिंसा केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलाचा सुनियोजित कट, FIR मध्ये उल्लेख
rahul gandhi : राहुल गांधींना लखीमपूर खिरीला जाण्यास यूपी सरकारने परवानगी नाकारली
फोनद्वारे प्रियांकांचा कार्यकर्त्यांशी संवाद

उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलंय. इथूनच प्रियांका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी फोनद्वारे संवाद साधला. गेस्ट हाऊसच्या बाहेरही काँग्रेस समर्थकांनी प्रियांका गांधी यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत उत्तर प्रदेश सरकारच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आज राहुल गांधी लखीमपूरला जाणार?

दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज लखीमपूर खीरीला दाखल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून उत्तर प्रदेश सरकारकडे लखीमपूर खीरीच्या हिंसाचारात बळी पडलेल्या शेतकरी आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, उत्तर प्रदेश सरकारकडून परवानगी नाकारण्यात आलीय. याच संदर्भात आज सकाळी १०.०० वाजता राहुल गांधी एक पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, लखनऊमध्ये ८ नोव्हेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलंय. सुरक्षा व्यवस्था, करोना आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं कारण देण्यात आलंय.

VIDEO: ‘हा व्हिडिओ पाहिलात का?’ म्हणत प्रियांकांकडून मोदींना लखीमपूरला येण्याचं आवाहन
लखीमपूर हिंसा : बेफामपणे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा व्हिडिओ समोर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: