IND vs NZ ODI – वर्ल्ड कप तोंडावर असताना टीम इंडियाची इज्जत गेली, खराब परफॉर्मन्समुळे मालिका गमावली
वाचा: सूर्या, धवन, पंत सगळेच ठरले फेल…शेवटी टीम इंडियासाठी धावून आला गोलंदाज!
न्यूझीलंडचा डाव सुरू झाल्यानंतर १८ षटके होताच पावसामुळे मध्येच थांबवण्यात आला. यामध्ये १८ षटकांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने १०४ धावा केल्या. पावसामुळे मॅच थांबण्यापूर्वी डेवॉन कॉन्व्हेने ३८ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडचा कर्णधार कॅन विल्यमसन नुकताच मैदानात आला होता. न्यूझीलंड चा सलामी वीर फिन अॅलेन याने ७५ धावा केल्या होत्या आणि त्याला उमरान मलिकेने झेलबाद केले.
हेही वाचा: माझा रेकॉर्ड खराब नाही… हर्षा भोगलेंच्या त्या प्रश्नावर LIVE सामन्यातच ऋषभ पंत भडकला
डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाच्या धावांपेक्षा ५० धावा पुढे होता. पण या सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू होण्यासाठी कमीत कमी २० षटके पूर्ण होणे आवश्यक होते. पण केवळ १८ षटके पूर्ण झाली असल्याने डकवर्थ लुईस नियम लागू झाला नाही आणि हा सामना रद्द करण्यात आला.
वाचा: IND vs NZ तिसरी वनडे: पावसामुळे मॅच थांबली, DLS लागू झाल्यास भारत सामना
वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी (५१) खेळी आणि फलंदाज श्रेयस अय्यरच्या ४९ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४७.३ षटकांत दहा गडी गमावून २१९ धावा केल्या. त्याचवेळी भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २२० धावांचे आव्हान दिले. किवी संघाकडून अॅडम मिलने आणि डॅरिल मिशेल या गोलंदाजांनी ३-३ बळी घेतले. भारताच्या फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही युनिटने आपली अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली आहे.