lakhimpur kheri : ‘लखीमपूर हिंसाचारातील मारेकऱ्यांना केंद्र सरकार वाचवतेय’
लखीमपूर घटनेची देशभरात चर्चा
लखीमपूरमध्ये जे काही घडले, त्यावर देशभरात चर्चा सुरू आहे. मारेकऱ्यांना अजून अटक का केली नाही? मारेकऱ्यांना का वाचवले जात आहेत? केंद्र सरकार मारेकऱ्यांना वाचवण्यात व्यग्र आहे. लखीमपूरमध्ये जे घडले ते ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारे आहे. शेतकऱ्यांनी सरकारचे काय बिघडवले? आहे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
मुख्यमंत्री केजरीवालांचा प्रश्न
मारेकऱ्यांना अद्याप अटक का केली नाही? काय कारण आहे? त्यांना का वाचवले जात आहे? एवढ्या गर्दीच अनेकांना चिरडून कोणीतरी निघून जातंय आणि संपूर्ण यंत्रणा त्या मारेकऱ्याला वाचवण्यात गुंतली आहे. हे आपण आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये बघितलं आहे, असं ते म्हणाले.
Lakhimpur Violence: प्रियांका, राहुल गांधींसहीत तीन नेत्यांना लखीमपूर जाण्याची परवानगी
एकीकडे सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते मृतांच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना त्यांना तुरुंगात टाकले जात आहे, हा कुठला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे ही सर्वांची मागणी आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.