priyanka gandhi : प्रियांका गांधी आक्रमक; म्हणाल्या, ‘PM मोदींना अजय मिश्रांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावीच लागेल’
आम्ही प्रत्यक्षदर्शींशी बोललो. त्या सर्वांनी मंत्र्यांच्या मुलाला पाहिले आहे आणि त्याला ओळखतात. मग पंतप्रधान काय करताहेत? जनतेला काय संदेश दिला जातोय? तुम्हाला कुणीही चिरडलं आणि मारलं पण तो आपल्या पक्षाचा असेल तर त्याच्यावर काहीच कारवाई होणार नाही? देशात असाच मेसेज जातोय, असं म्हणत प्रियांकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
‘सत्य दडपण्याचा प्रयत्न होतोय’
मीडिया सत्य दाखवत आहे. पण प्रशासन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. जगात कोणत्याही देशात अशी घटना घडली आणि केंद्रीय मंत्र्याचा मुलगा त्यात आरोपी असूनही मंत्री राजीनामा देत नाही, असं होणार नाही. मला असा देश दाखवा. पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर निष्पक्ष तपास झाला पाहिजे. आपला मुलगा घटनेस्थली नव्हता, असा दावा मंत्री करत आहेत. तरीही निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते निर्दोष असतील तर नंतरही मंत्री होतील.
Lakhimpur Violence: अटक नाही, हत्या प्रकरणातील आरोपी ‘मंत्रीपुत्रा’ला पोलिसांनी धाडले समन्स
Lakhimpur Violence: आरोपी कोण? कुणाला अटक? सर्वोच्च न्यायालयानं यूपी सरकारला विचारला प्रश्न