भ्रमनिरास ! रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपातीला हुलकावणी, पतधोरणात घेतला ‘हा’ निर्णय


हायलाइट्स:

  • रिझर्व्ह बँकेने तूर्त व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • दरकपातीच्या आशेवर असलेल्या ग्राहकांचा या निर्णयाने भ्रमनिरास झाला.
  • स्वस्त कर्जांसाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल.

मुंबई : देशात सुरु असलेली व्यापक लसीकरण मोहीम, मागील दोन महिन्यात अर्थचक्राला आलेली गती त्याचबरोबर महागाईचा आलेख याचा अंदाज घेत रिझर्व्ह बँकेने तूर्त व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला. दसरा-दिवाळी तोंडावर असताना रेपो दर कमी झाला तर कर्जे स्वस्त होतील या आशेवर असलेल्या ग्राहकांचा रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने भ्रमनिरास झाला. आता स्वस्त कर्जांसाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल.

पेट्रोलियम कंपन्यांना अच्छे दिन! मुंबईत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजची दरवाढ
पतधोरण समितीची बुधवारपासून बैठक सुरु होती. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर बँकेकडून व्याजदर जैसे थेच ठेवले. सलग आठव्या बैठकीत व्याजदर जैसे थे राहतील. यापूर्वी मार्च २०२० मध्ये बँकेने रेपो दर ०.७५ टक्क्याने कमी केला होता. तर त्यानंतर मे २०२० मध्ये रेपो दरात ०.४० टक्के कपात करण्यात होती. या दोन कपातीनंतर रेपो दर ४ टक्क्यांपर्यंत खाली आला होता.

गृह कर्ज घेताय ; सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँंकेने केली कर्ज दरात कपात
वित्तीय बाजारपेठांचे कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी, रिजर्व बँकेने नवीन आणि अपारंपरिक पावलं उचलली आहेत. कोरोना साथीमुळे उत्पन्न झालेल्या संकटाचा वेळेवर सामना करण्यासाठी, नियमांपलिकडे जाऊन केलेले हे उपाय उपयुक्त ठरले, असे दास यांनी स्पष्ट केले. संसर्ग कमी होत आहे आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढतो आहे, हे प्रयत्न खाजगी खपाला सहाय्यभूत ठरत आहेत, प्रलंबित मागणी आणि सणासुदीमुळे शहरी मागणी दुसऱ्या तिमाहीत आणखी वाढेल, असे दास यांनी सांगितले.

बिटकॉइनमध्ये प्रचंड वाढ; ‘या’ कारणांमुळे बिटकॉइनसह इतर क्रिप्टो करन्सी महागले
खाद्यतेल, पेट्रोल आणि डिझेल दरवाढ, स्वयंपाकाचा गॅस याच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे महागाईचा पारा चढला. दरम्यान, मॉन्सूनची दमदार कामगिरी आणि खरीप हंगामात चांगले उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने भाजीपाला, दाली यांच्या किमतीत नियंत्रणात राहतील, असे शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितले. इंधन दरवाढ आणि त्याचा महागाईवर होणार परिणाम याबाबत देखील दास यांनी चिंता व्यक्त केली.

चालू वर्षात महागाई दर ५.३ टक्के राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या तिमाहीत ५.१ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.५ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के राहील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बँकेने विकास दर ९.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. ज्यात दुसऱ्या तिमाहीत जीडीपी दर ७.९ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. एकूण मागणीत वाढ होत आहे तथापि, थोडी मंदगती कायम आहे. उत्पादन अद्यापि कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत कमीच आहे. सावरण्याचा दर धोरणात्मक पाठबळावर अवलंबून असून तो असमान असलेला दिसतो. प्रत्यक्ष संपर्क येणारी क्षेत्रे अद्यापि पिछाडीवर आहेत.

बाजारातील रोकड तरलता टिकून राहावी यासाठी बॉण्ड खरेदी वाढवण्याची गरज आहे, असे शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आज पतधोरण स्थिर ठेवल्याने सामन्यांसाठी हा निर्णय निराशाजनक ठरला आहे. बँकाकडून गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्जदरात नजीकच्या काळात कपात होण्याची शक्यता कमीच आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: