coronavirus latest updates: थोडा दिलासा, थोडी चिंता!; राज्यात करोनाची ‘अशी’ आहे आजची स्थिती!


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ६२० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण २ हजार ९४३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ५९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही घटल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, आज मृत्यूंची संख्या वाढल्याने काहीशी चिंताही आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ६२० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ६८१ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ९८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ४१३ इतकी होती. तर, आज ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४९ इतकी होती. (maharashtra registered 2620 new cases in a day with 2943 patients recovered and 59 deaths today)

आज राज्यात झालेल्या ५९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ९७ हजार ०१८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला मोठा धक्का; कोर्टाने जामीन नाकारला, तुरुंगात रवानगी

सक्रिय रुग्णसंख्येचा ग्राफ पुन्हा आला खाली

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ०११ इतकी आहे. काल ही संख्या ३३ हजार ३९७ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ८ हजार ६८३ इतका खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ४ हजार २१७ इतकी वाढली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ३ हजार ४४३ अशी खाली आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ००५ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार २७९ इतकी वाढली आहे. तर, सांगलीत एकूण ७९९ वर खाली आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान तुरुंगात बराक क्रमांक १ मध्ये; बाहेरचे अन्न घेता येणार नाही

मुंबईत उपचार घेत आहेत ५,९४१ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ९४१ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत ६०८ इतकी कमी झाली आहे, सिंधुदुर्गात ६५८ इतकी खाली आली आहे, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८०६ इतकी खाली आली आहे.

नंदुरबार, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५२०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ८६ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ९९ वर आली आहे. तर नंदुरबार, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये राज्यातील सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला पकडून आणणाऱ्या के. पी. गोसावीला पुणे पोलिस शोधतायत

२,४१,९७२ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९९ लाख १४ हजार ६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ७३ हजार ०९२ (११. टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ९७२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ०५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: