maneka gandhi : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हटवले; मनेका गांधींनी सांगितली ‘मन की बात’!
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ७ ऑक्टोबरला पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली होती. मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आले. केंद्राच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूने वरुण गांधींनी सतत बोलत आहेत.
lakhimpur kheri incident : लखीमपूर हिंसाचार; अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची पोलीस कोठडीत रवानगी
काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी हे कार्यकारिणीचे नवीन सदस्य आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारमण कार्यकारिणीत कायम आहेत. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंग, प्रल्हाद पटेल, सुब्रमण्यम स्वामी, सुरेश प्रभू, वसुंधरा राजे, दुष्यंत सिंह, विजय गोयल, विनय कटियार आणि एस. एस. अहलुवालिया यांना नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही.
Lakhimpur Violence: ‘आशिष ऐवजी जर कुणी अतिक असता तर…’, ओवैंसींची सत्ताधाऱ्यांवर टिप्पणी
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी विविध विषयांवर चर्चा करते आणि संघटनेच्या कामकाजाची रुपरेषा ठरवते.