महागाईने जनता त्रस्त; मंत्री म्हणतात, लोकांनी कमी खावं!
एका सभेला संबोधित करताना अली अमीन यांनी, महागाईच्या वादावर बोलताना राष्ट्रवादाची आसरा घेत लोकांना म्हटले की, चहामध्ये मी दोनशे दाणे टाकतो. त्यापैकी काही दाणे कमी टाकले तर चहातला गोडवा कमी होणार नाही. देशासाठी स्वत:च्या आत्मनिर्भरतेसाठी एवढेही बलिदान देऊ शकत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.
मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी गव्हाचे पीठ आणि इतर खाद्यान्नांची टंचाई निर्माण झाली होती.
पाकिस्तानच्या नागरिकांना कमी खाण्याचा सल्ला याआधीही देण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी १९९८ मध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती. त्यावेळी पाश्चिमात्य देशांकडून पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लावण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी नवाझ शरिफ यांनी रेडिओवरून पाकिस्तानला संबोधित करताना एक वेळच जेवण्याची तयारी ठेवावी असे आवाहन केले होते.
आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानची परिस्थिती चिंताजनक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनेदेखील पाकिस्तानमधील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कौतुक केले होते.