अमरावती : अमरावती जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढत आहे. आता हे चोरटे घरफोड्या वाहनचोरीवरच थांबले नसून त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाच्या धान्यावरही डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपला मोर्चा हा शेतीमाललाकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे.
अमरावती मार्गावरील मेघनाथपूर स्टॉपजवळ लागूनच रोडटच असलेले हर्षल पराते यांच्या शेतात सदर चोरी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पराते हे शेतात चक्कर मारण्याकरिता गेले असता त्यांना सदर बगीच्या हा खाली दिसला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की चोरी झाली आहे. तेव्हा त्यांनी सदर घटनेसंदर्भात पोलीस स्टेशन अचलपूर येथे माहिती दिली. संबधित अधिकारी यांनी येऊन त्याची माहिती घेतली. तशी अधिकृत तक्रार देण्यात आली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आयशर टेम्पोला आग; एकाचा होरपळून मृत्यू
विशेष म्हणजे पाच लक्ष रुपये किमतीचा संत्रा चोरी गेला असताना पोलिसांनी त्याचे मूल्यांकन फक्त ५० हजार रुपये केले. मात्र, अनेक विनवणीनंतर त्यांनी दोन लाख ५० हजार रुपये एवढे मूल्यांकन केलं. पाच लक्ष रुपयाचा संत्रा चोरी गेला असताना पोलिसांनी अर्धीच किंमत दाखविल्याने शेतकरी चिंतेत आहे. ग्रामीण भागातील चोरी घटना व त्यातील किमतीत कमी दाखविण्यासाठी ग्रामीण पोलीस हे करत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे.
राज्यावर दोन वर्षापासून करोनाचं संकट होते. त्यामुळे दोन्ही वर्ष संत्र हा बेभाव विकला गेला अशातच आता ग्रामीण भागात चोरांनी आपले लक्ष शेतीमालाला कडे वळविला आहे. एकतर दोन वर्षा पासून संत्राला भाव नाही त्यात ही झालेली चोरी त्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. सदर चोर हे सापडून कडक कार्यवाही व्हावे ही त्यांची मागणी आहे.
प्रियांका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
Source link
Like this:
Like Loading...