lakhimpur case : लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा अमेरिकेतही गाजतोय! सीतारामन यांना विचारला प्रश्न, काय दिले उत्तर?
भारतात अशी प्रकरणं देशाच्या विविध भागांमध्येही घडत आहेत. भारत जाणून असलेल्यांनी डॉ.अमर्त्य सेन यांच्यासह इतर अनेकांनी प्रत्येक वेळी अशी घटना घडली की ती मांडली पाहिजे. या प्रकारची घटना फक्त तेव्हाच उभी करू नये जेव्हा ती आपल्यासाठी अनुकूल असेल. कारण ही घटना अशा राज्यात घडली जिथे भाजप सत्तेत आहे. ज्यामध्ये मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याचा मुलगा कदाचित अडचणीत आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं.
‘लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेमागे कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास केला जाईल. आणि हे आपल्या पक्षाचा किंवा पंतप्रधानांचा बचाव करण्यासाठी नाही. हा भारताचा मुद्दा आहे. भारतासाठी बोलेन. गरिबांना न्याय देण्याविषयी बोलेल. यावर कुणी खिल्ली उडवली तर त्याला मी उत्तर देईन. तथ्यांवर बोला, असं त्यांना मी सांगेल’, असं उत्तर सीतारामन यांनी दिली.
लखीमपूर हिंसा : राहुल-प्रियांका गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला, दोन मागण्या मांडल्या
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरला हिंसाचार झाला. यात ४ शेतकऱ्यांसह एकूण ८ जणांची हत्या केली गेली. यावरून उत्तर प्रदेशातील भाजपचे योगी सरकार गोत्यात आले आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
cabinet decision : खतांवर अनुदान देत शेतकऱ्यांना दिलासा, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
भारत सरकारने आणलेल्या तीन सुधारित कृषी कायद्यांवर विविध संसदीय समित्यांनी एक दशकांहून अधिक काळ चर्चा केली. भाजप २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर या तीन कायद्यांवर केंद्र सरकारने राज्य सरकारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आणि प्रत्येक भागधारकांशी सल्लामसलत केली, असं उत्तर शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील एका प्रश्नाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं.