अटल पेन्शन योजनेमधून कसे काढायचे पैसे; जाणून घ्या सर्वकाही
वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर –
वयाच्या ६० वर्षांनंतर कोणत्याही कारणामुळे ग्राहकाचा मृत्यू झाल्यास –
ग्राहकाचा मृत्यू झाल्यास पती किंवा पत्नीला ही पेन्शन मिळेल आणि त्या दोघांच्या (ग्राहक आणि जोडीदार) मृत्यूनंतर ग्राहकाचे वय ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा केलेली पेन्शन रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल.
वयाच्या ६० वर्षांपूर्वी योजनेतून बाहेर पडल्यास :
वयाच्या ६० वर्षांपूर्वी योजनेच्या बाहेर पडण्यास परवानगी नाही. केवळ पीएफआरडीए (PFRDA) द्वारे अपवादात्मक परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. म्हणजेच, लाभार्थीचा मृत्यू किंवा असाध्य रोग इत्यादींमध्ये पूर्व-परिपक्व निर्गमनची तरतूद (प्री मॅच्युअर एक्झिट).
६० वर्ष वयापूर्वी ग्राहकाचा मृत्यू झाल्यास :
एपीवाय अंतर्गत संपूर्ण ठेव रक्कम पती-पत्नी (जोडीदार)/नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल, पण जोडीदार/नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शन देय होणार नाही.
अटल पेन्शन योजनेतील ग्राहकांना योजनेतून बाहेर पडण्याची सुविधा आहे. जर एखाद्या ग्राहकाला योजना पूर्ण झाल्यावर बाहेर पडायचे असेल, तर त्याने हे सुनिश्चित केले पाहिजे की, त्याचे बचत बँक खाते अजूनही सक्रिय आहे. यामुळे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि वेळेत बँक खात्यात पैसे जमा होतील.