Farmers Protest: ‘भारत बंद’ दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू
हायलाइट्स:
- हृदयविकाराच्या धक्क्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू
- हरयाणा पोलिसांनी दिली माहिती
- परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांचं म्हणणं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर यासंबंधात अधिक माहिती देता येईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो. परंतु, यासाठी कोणत्याही बाजुनं कोणत्याही अटी-शर्ती लावल्या जाऊ नयेत. मोकळ्या मनानं चर्चा करून या प्रश्नांवर उत्तर काढण्याचा प्रयत्न करायला हवा, असं मत हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी व्यक्त केलंय.
LIVE: ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर तणाव, सुरक्षेत वाढ
उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केलाय.
दरम्यान, आंदोलकांनी हरयाणातील बहादूरगढ रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवरही ठाण मांडलंय. रेल्वे ट्रॅकवर बसून शेतकरी आपलं विरोध प्रदर्शन करत आहेत.
कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या १० महिन्यांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. ऊन, थंडी, पाऊस यांची तमा न बाळगता शेतकरी आपल्या मागण्या मांडत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत ६०० हून अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचं शेतकरी संघटनांनी म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून आज पुन्हा एकदा ‘भारत बंद‘ची हाक देण्यात आलीय. सकाळी ६.०० वाजल्यापासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.