भारतीय संघाने विजयासह केला विश्वचषक स्पर्धेला अलविदा, नामिबियावर मिळवला दणदणीत विजय
भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील शेवट गोड केला. भारताने नामिबियाच्या संघावर दणदणीत विजय साकारला आणि विश्वचषकाला विजयासह अलविदा केला. भारताला विजयासाठी १३३ धावांचे आव्हान देण्या आले होते. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ते सहज पूर्ण केले.