lakhimpur kheri : यूपीत लखीमपूर-खेरीमध्ये हिंसाचार; ५ शेतकऱ्यांचा मृत्यू? तणावाचं वातावरण
हा नरसंहार पाहून जो कोणी गप्प आहे, समजून घ्या तो आधीच मेला आहे. पण आम्ही शेतकऱ्यांचे हे बलिदान व्यर्त जाऊ देणार नाही. किसान सत्याग्रह जिंदाबाद!, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
भाजप देशातील शेतकऱ्यांचा किती द्वेष करते? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांनी आवाज उठवला, तर तुम्ही त्यांना गोळ्या घालणार का, तुम्ही गाडीखाली तुडवाल का? हे खूप झालं. हा शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपच्या क्रूर विचारसरणीची जहागिरी नाही. शेतकऱ्यांचा सत्याग्रह आणखी बळकट होईल आणि शेतकऱ्याचा आवाज आणखी मोठा होईल, असं प्रियांका गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
mamata banerjee : अखेर ममता बॅनर्जींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचली; भवानीपूर पोटनिवडणूक जिंकली
मोदी सरकार शेतकऱ्यांच्या रक्ताची इतकी तहानलेली झाली आहे, की देशाच्या गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने लखीमपूर खेरीमध्ये अनेक शेतकऱ्यांना आपल्या कारने निर्दयीपणे चिरडले. कर्नाल ते लखीमपूर खेरीपर्यंत. तुमची सत्ता ‘रक्तरंजित नंगा नाच’ केला आहे. हे फोटो भीषण आहेत, पण भाजपचे सत्य दाखवणारे आहेत, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.