महाराष्ट्रातील भाजीपाला व फळे गोव्यातील विक्री केंद्राला होणार लिंक

महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार – गोवा कृषिमंत्र्याबरोबरच्या बैठकीत निर्णय

पणजी /ज्ञानप्रवाह न्यूज – गोवा राज्य सरकारच्या फळे व भाजीपाला विक्री केंद्राला महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला लिंक करण्याबाबत गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी आश्वासन दिले.

गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आ.परमेंद्र शेट यांनी फळे व भाजीपाला सप्लाय करण्याबाबत तसेच फळे व भाजीपाला पुरवठा करण्याबाबतच्या अडचणीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.पहिल्या टप्प्यात फळे पुरवठा करण्याबाबत आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने भाजीपाला पुरवठा करण्याबाबत बैठकीत निर्णय झाला.

गोवा सरकार दीड हजार आउटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना माफक किमतीत भाजीपाला व फळे देण्याचा उपक्रम राबवीत आहे.फळे व भाजीपाला विक्री केंद्राचा उपक्रम देशात फक्त गोवा राज्यातच राबविला जात आहे .गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.

गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्यासोबत कृषिभूषण अंकुश पडवळे, प्रकाश भोसले, भगवान चौगुले,जय राम आलदर, संतोष वाले

सदर शिष्टमंडळात कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्यासोबत उपसरपंच प्रकाश भोसले, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन जयराम आलदर,दूध संस्थेचे चेअरमन भगवान चौगुले,माजी सरपंच संतोष वाले आदी सहभागी होते.

सोलापूरच्या शेतकरी शिष्टमंडळाने फळे व भाजीपाला पुरवठ्याबाबत गोवा सरकारच्या गोव्यातील फळे व भाजीपाला २० विक्री केंद्रांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली.

सदर बैठकीत गोवा कृषी विभागाचे संचालक संदीप देसाई,गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई,व्यवस्थापक प्रसाद परब आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार:कृषीभूषण अंकुश पडवळे
गोवा सरकारनं फळे आणि भाजीपाली विक्री केंद्र सुरु केली आहेत.हे देशासाठी आदर्श विक्री मॉडेल असल्याची माहिती कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी दिली. आता महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहेत याचा शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.गोवा सरकारला गरजेनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला घेता येतील.याबाबतची बोलणी सकारात्मक झाल्याचे पडवळे म्हणाले.यात शेतकऱ्यांना बाजार समित्यांपेक्षादेखील चांगला बाजारभाव मिळेल असं मत पडवळे यांनी व्यक्त केले. या माध्यमातून थेट सरकारशी व्यवहार होणार आहे. जर हे काम लवकर सुरु झालं तर गोवा सरकारकडून मागील तीन वर्षाचे बाजारभाव घेऊन मल्टीपल क्रॉपचं नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती अंकुश पडवळे यांनी पत्रकारांना दिली.

Leave a Reply

Back To Top