aryan khan case : आर्यन खानला अद्याप जामीन का मिळाला नाही? रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
जे दारू पितात, सिगारेट ओढतात त्यांना तुरुंगात पाठवलं जात नाही. मात्र, कोणाकडे अंमली पदार्थ कितीही प्रमाणात आढळले तरी त्यांना तुरुंगात पाठवलं जातं. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. अंमली पदार्थांचं व्यसन असणाऱ्यांना योग्य आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं. तरच परिस्थिती सुधारेल, अशी शिफारस आमच्या मंत्रालयाने केली आहे, असं आठवलेंनी सांगितलं.
sameer wankhede : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप, NCB चं पथक उद्या मुंबईत येणार
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची प्रकरणं समोर
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आर्यन खानवर झालेल्या कारवाईत कोणताही पक्षपातीपणा केलेला नाही. त्याच्याविरुद्ध अनेक पुरावे आहेत. यामुळेच त्याला दंडाधिकारी न्यायालय आणि सत्र न्यायालयातून जामीन मिळालेला नाही. ईडी, सीबीआय, एनसीबीच्या छाप्यांमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असं असं रामदास आठवले म्हणाले.
Aryan Khan Case: आर्यन खानचे तिसरे वकील; मुकुल रोहतगींच्या खांद्यावर जामिनाची जबाबदारी…
अंमली पदार्थांच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो योग्य दिशेने आणि ठोस कारवाई करत आहे. अनेकांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अंमली पदार्थांचा वाढते व्यसन हे खेदजनक आहे. यामुळे शक्य तितक्या लवकर याला रोखणं महत्त्वाचं आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं.