बीड मशीद स्फोट प्रकरणाला भाजप नेता जबाबदार! वारिस पठाण यांचा आरोप

[ad_1]

waris pathan
राज्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्ध मसाला गावात रविवारी पहाटे दोन तरुणांनी मशिदीत स्फोट घडवून आणला. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि या प्रकरणात संशयित विजय राम गव्हाणे आणि श्रीराम अशोक सगडे यांना अटक केली. घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाल्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण परस्पर वादातून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ALSO READ: पंतप्रधान मोदींनी निवृत्तीची घोषणा करण्यासाठी आरएसएस कार्यालयात भेट देण्याचा संजय राऊतांचा दावा
या प्रकरणात, वारिस पठाण यांनी जलदगती न्यायालयात प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बीडमधील मशिदीतील स्फोटावर एआयएमएआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण म्हणाले, “त्यांना कोण प्रोत्साहन देते? भाजप नेत्यांकडून दररोज दिल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. सरकारने या प्रकरणातील आरोपींवर कठोर यूएपीए कायदा लागू करावा, त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि त्यांना कठोर शिक्षा मिळावी.”

ALSO READ: बीड जिल्ह्यात मशिदीत मध्यरात्री रात्री मोठा स्फोट
ते म्हणाले, जे भाजपचे नेते बेकायदेशीर वक्तव्य देतात त्यांना देखील शिक्षा मिळावी. नेत्यांच्या द्वेषामुळे मशिदींवर हल्ले होत आहे. त्यावर रिल्स बनवल्या जात आहे. जेव्हा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नाही तेव्हाच लोकांचे धाडस वाढते. म्हणून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करत आहे जेणे करून या मुळे भविष्यात होणाऱ्या घटनांना रोखू शकू. 

बीडच्या मशिदी हल्ल्यामागे भाजपचे नेते असल्याचे वारीस पठाण म्हणाले, कारण भाजप नेत्यांना हे माहित आहे की बीड हा एक संवेदनशील जिल्हा असून देखील ते धर्मविरोधी भाषण देतात आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम म्हणजे बीड मशिदीतील स्फोट आहे. आरोपींसह भाजपच्या नेत्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे.

Edited By – Priya Dixit

ALSO READ: कुणाल कामरा यांना सुरक्षा द्यावी,संजय राऊतांची केंद्र सरकार कडे मागणी

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top