पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर,मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसेच्या मागणीला यश,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रा अनुदान दहा कोटी रुपये केले मंजूर

पावसामुळे नुकसान झालेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक यांना त्वरित मदत करण्याचे आदेश

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री शासकीय विश्रामगृहावर मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते दिलीप धोत्रे, जयप्रकाश बाविस्कर यांनी भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून निवेदन दिले.

येत्या आषाढी एकादशीला पंढरपूर शहराला जास्तीत जास्त मदत करावी. आषाढी यात्रेस येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आणि आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या प्रत्येक दिंडीला शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरवर्षी आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र शासन 5 कोटी रुपये देत होते, परंतु हे यात्रा अनुदान अतिशय कमी पडत असल्याने यावर्षी दहा कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.

पंढरपूर तालुक्यात प्रचंड पाऊस पडल्याने हजारो शेतकऱ्यांचे तसेच अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे यामुळे शहरातील नागरिकांना भरीव मदत मिळावी अशी मागणी मनसेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आषाढी यात्रेसाठी यात्रा अनुदान दहा कोटी रुपये देण्याचे संबंधितांना आदेश दिले आणि यात्रेला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला मदत करण्याचेही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पंढरपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना मंजूर होऊन चार वर्षे झाले मात्र अद्यापही प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाली नाहीत,प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बंद पडलेले आहे तरी ताबडतोब प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चालू करून लाभार्थ्यांना घरे द्यावीत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यावेळी त्वरित प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे देण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले. शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Leave a Reply

Back To Top