गहू चोरले म्हणून अल्पवयीन मुलांना दिली भयंकर शिक्षा

[ad_1]


उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. येथे तीन अल्पवयीन मुलांचे तोंड काळे करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. चोरीच्या आरोपावरून तिन्ही मुलांचे मुंडन करण्यात आले आणि नंतर त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची परेड करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार 5 किलो गहू चोरल्याबद्दल गावातील तीन जणांनी मुलांना शिक्षा दिली.

 

त्यांनी प्रथम मुलांना मारहाण केली आणि नंतर अल्पवयीन मुलांचे मुंडन केले आणि त्यावर 'मी चोर आहे' असे लिहिले, परंतु यानेही त्यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी मुलांचे तोंड काळे केले, त्यांचे हात बांधले आणि त्यांना गावात फिरवले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नानपारा कोतवाली परिसरातील ताजपूर गावचे आहे. अशा कृत्यांनंतर आजूबाजूच्या वस्तीतील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलांवर केवळ 5 किलो गहू चोरल्याचा आरोप होता, त्यानंतरही त्यांच्याशी अशीच वागणूक देण्यात आली. अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top