ग्रामस्थांनी मनावर घेतले तर गाव स्वच्छ व समृद्ध होईल – किर्तनकार शिवलिला पाटील
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गोपाळपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –ग्रामस्थांनी मनावर घेतले तर कोणतेही अभियान यशस्वी होते. गाव स्वच्छ, समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे,असे आवाहन किर्तनकार शिवलिला पाटील यांनी केले. गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जनजागृती कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भुजबळ, प्रसिध्द भारूडकार चंदाताई तिवाडी, विस्तार अधिकारी संदीप खरबस, ग्रामविकास अधिकारी वैभव आहाळे, सरपंच -पांडुरंग देवमारे, उपसरपंच सौ. कमलाक्षी गुरव सदस्य विलास मस्के , सौ.उज्वला बनसोडे,सौ.पुष्पा बनसोडे, लक्ष्मण लेंगरे, उदय पवार, सौ.सविता आसबे, मनीषा आसबे, विक्रम आसबे, राहुल माने, इकबाल कांबळे, गोदाबाई सूर्यवंशी,सीमा म्हेत्रे,पंचायत अधिकारी ज्योती पाटील,संध्या तिवाडी, गोपाळपूर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किर्तनकार शिवलिला पाटील यांनी श्रमदान, स्वच्छता व लोकसहभागाचे महत्त्व विशद करताना,स्वच्छतेचा संस्कार झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आवश्यक आहे, असे सांगितले. त्यांनी आपल्या आईचे उदाहरण देत घर दिवसातून अनेक वेळा स्वच्छ ठेवण्याची सवय सांगून, स्वच्छतेच्या कामात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही गावाच्या विकासासाठी मिळालेली मोठी संधी असून ती प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी नमूद केले.सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतींनी या अभियाना प्रभावीपणे काम करावे. स्पर्धा असली तर जे होणारे काम आहे ते गावांच्या हिताचे आहे. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेले या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा.

यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगून सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करा – सीईओ कुलदीप जंगम
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धन, लोकवर्गणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून स्वच्छ, समृद्ध व सक्षम ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत,असेही त्यांनी सांगितले.





