नागपूर : कालव्यात आंघोळीसाठी गेलेले चार विद्यार्थी वाहून गेले

[ad_1]

Death
रामटेकजवळील पेंच नदीच्या कालव्यात सोमवारी चार विद्यार्थी वाहून गेल्याचे घटना महाराष्ट्रातील नागपूर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य आपत्ती दलाने मनदीप पाटील वय 17, मयंक मेश्राम वय 14, अनंत साबेर वय 13 आणि मयूर बागरे वय 15 यांचा शोध सुरू केला आहे. तसेच नुकतेच नदीतून पाणी सोडण्यात आल्याने कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते वाहून गेल्याचे पोलीस अधिकारींनी सांगितले.

तसेच अंधारामुळे शोध मोहीम तूर्तास पुढे ढकलण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थी रामटेक येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top