रत्नत्रय इंग्लिश मिडीयम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुयश
बक्षीस वितरण समारंभ अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते संपन्न
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त महाराष्ट्र राज्य शासना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते संपन्न झाला.

या बक्षीसांचा रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक संचालक व सदाशिवनगरचे सरपंच विरकुमार दोशी व कोषाध्यक्ष मिहीर गांधी यांनी स्वीकार केला.या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष केतन शहा, समाजरत्न रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा हे उपस्थित होते.
रत्नत्रय इंग्लिश स्कूल ची कु श्रेया नितीन राऊत इयत्ता सातवी या विद्यार्थींनीने ५ वी ते ८ वी गटामध्ये प्रथम क्रमांक ( बक्षीस रोख रक्कम ५५५५ )पटकावला. कु.आर्या मनोज दोशी इयत्ता दहावी या विद्यार्थींनीने ८वी १०वी गटामध्ये प्रथम क्रमांक ( बक्षीस रोख रक्कम ५५५५ ) पटकावला असून कु.धनश्री मनोज नाळे हिचा चतुर्थ क्रमांक (बक्षीस रोख रक्कम ११११) आलेला आहे.

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त महाराष्ट्र राज्य शासना तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत ८५० विद्यार्थी बसले होते. या स्पर्धेमध्ये रत्नत्रय इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनंतलाल दोशी, संस्थेचे सचिव प्रमोद दोशी, संस्थेचे उपाध्यक्ष विशाल गांधी, संस्थेचे संचालक डॉ सतिश दोशी, रोनक चंकेश्वरा, अभिजीत दोभाडा, सुरेश धाईंजे, बबन गोफणे, वैभव शहा,अमित गांधी, महावीर शहा तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ व पालक वर्ग,मुख्याध्यापक दैवत वाघमोडे सर यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी स्कूल च्या उपमुख्याध्यापिका सविता देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.