यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार – आमदार नरेंद्र पाटील

यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार – आमदार नरेंद्र पाटील The state’s Mahavikas Aghadi government is responsible for this – MLA Narendra Patil
पंढरपूर - सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले यामध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरले असल्यामुळे आरक्षण रद्द झाले,यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील narendra patil यांनी पंढरपूर येथे संत तनपुरे महाराज मठामध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या maratha Kranti sangharsh morcha बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना केला . 

      यावेळी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे samadhan awtade, जि.प.सदस्य वसंत देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रशांत देशमुख, डॉ.बी.पी.रोंगे सर,भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ,अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना पाटील म्हणाले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाची दिशाभूल केली. या शासनाच्या काळात एकाही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केला नाही. आरक्षण देतो म्हणून फक्त वल्गना करून फसवणूक केलेले आरक्षण हे आमच्या हक्काचा आहे. आता आरक्षणासाठी ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

       आमदार आवताडे यांनी मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे सांगितले. 

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप मांडवे,किरण घाडगे, अमरजित पाटील यांचीही भाषणे झाली. माळशिरसचे श्यामराव गायकवाड, दिलीप साबळे, शिवसेनेचे अध्यक्ष जयवंत माने, सागर यादव, नातेपुतेचे संभाजी पवार, रवी भोसले, सचिन गंगथडे, गुरुदास गुटाळ, संतोष जाधव, गिड्डे सर, अमोल पवार, काका यादव,पांडुरंग शिंदे, श्यामराव साळुंखे,जीवन गायकवाड, नितीन जगदाळे, धनवे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिस्किटे सर यांनी केले.मराठा समाजातली संघटनांचे पदाधिकारी , विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: