आरआरसी ची कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या उग्र रोषास सामोरे जावे लागेल – दिपक पवार Farmers should be given justice by taking action of RRC, otherwise they will have to face the wrath of farmers – Deepak Pawar
भाळवणी,पंढरपूर ता.पंढरपूर - प्रादेशिक सह संचालक (साखर)विभाग सोलापूर यांना दिपक दामोदर पवार मु.पो.जैनवाडी ता.पंढरपूर माजी संचालक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.भाळवणी यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या एफआरपी न दिलेबाबत आरआरसी कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे.
या अर्जात त्यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.भाळवणी ता.पंढरपूर जि.सोलापूर यानी गळीत हंगाम सन २०१८ / १ ९ व गळीत हंगाम सन २०२०/२१ या दोन्ही हंगामातील गाळप झालेल्या संपूर्ण उसाची संपूर्ण एफआरपी दिली गेलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर आरआरसी कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम त्वरीत मिळावी तसेच गाळप हंगाम सन २०१८/ १९ सालची संपूर्ण एफआरपी दिलेली नसतानाही आपल्या विभागाकडून नवीन हंगामास गाळप परवाना दिला गेला ही बाब कायदेबाह्य आहे . त्यानंतर सन २०२०/२१ साली गाळप झालेल्या उसाची एफआरपी दिलेली नसताना यासाठी विविध शेतकरी संघटना वारंवार आंदोलने करत असताना आपल्याकडून आरआरसी वा इतर कोणतीही कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे .तरी सर्व बाबींचा विचार करत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि . भाळवणी यांच्यावर त्वरीत आरआरसी ची कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या उग्र रोषास आपणास सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी असे प्रादेशिक सह संचालक (साखर) सोलापूर विभाग सोलापूर यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिपक दामोदर पवार मु.पो.जैनवाडी ता.पंढरपूर माजी संचालक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.भाळवणी यांनीही अनेकवेळा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ,ऊस वाहतूकदारांसाठी त्यांचे पैसे मिळावेत यासाठी आंदोलने केलेली आहेत.
Like this:
Like Loading...