एक्झिट पोलच्या अंदाजा नुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता

राष्ट्रीय पातळीवर बदल झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप मध्ये संघटनात्मक पातळीवरती बदल होण्याची शक्यता


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


नवी दिल्ली – येत्या 4 जून रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारेल तो नवीन सरकार स्थापन करणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसात नव्या पंतप्रधानांचा शपथविधी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या निकालानंतर सत्ताधारी भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याचे संकेत असून पक्षातील राष्ट्रीय पातळीवर बदल झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवरती बदल होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर आता उद्या चार जून रोजी निकाल जाहीर होईल. या निकालानंतर देशाचे सरकार नेमके कोणाचे स्थापना होईल हे स्पष्ट होणार असले तरी एक्झिट पोल च्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . यानंतर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथ पंतप्रधानपदाची शपथ घेतील कारण भाजप मोदी यांनाच पंतप्रधानपदी ठेवणार असल्याचे नक्की आहे.असे असले तरी भाजपामध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होणार आहेत कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाल येथे सहा जून रोजी संपत असून नड्डां च्या जागी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नव्या नेत्याची निवड केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे आणि या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमध्येही फेरबदल होऊ शकतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading