माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी
म्हसवड ता.माण/ज्ञानप्रवाह न्यूज – माण तालुक्यातील म्हसवड मधील विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे प्रचंड जिद्द, चिकाटीच्या जोरावर मिळवलेले असून हे नक्कीच गौरवास्पद आहे, असे उद्गार म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी यांनी काढले.
नुकत्याच झालेल्या JEE (Main),CET परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ अहिंसा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आला होता.

JEE (Main) परीक्षेत कु.प्राजक्ता बाळासाहेब कलढोणे या विद्यार्थिनीने 98.06% मार्क्स मिळवले तसेंच कु.विशाखा अमोल माने या विद्यार्थिनीने CET परीक्षेत 99.04% मार्क्स मिळवले.
JEE (Main) ही परीक्षा ही देशपातळीवरील सर्वात कठीण परीक्षे मधील 3 नंबरची परीक्षा आहे या परीक्षेमध्ये 98% गुण मिळवले तर CET परीक्षा ही देखील सर्वोच्च परीक्षा आहे अशा परीक्षेमध्ये 99% गुण मिळवणे हे नक्कीच माण तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे .

या कार्यक्रमप्रसंगी ऍड.हांगे व्यक्त होताना म्हणाले की एखाद्याचं चांगलं झालेलं हल्ली लोकांना बघवत नाही, अशामध्ये एखाद्याच्या आनंदात आपला आनंद मानणे, त्यांचा गौरव करणे हा गुण जवळजवळ लोप पावत चालला आहे परंतु नितीन दोशी यापैकी एक आहेत जे लोकांच्या आनंदात आपला आनंद शोधतात.
या कार्यक्रमात बोलताना जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले की, कलढोणे आणि माने या विद्यार्थिनींनी मिळवलेले यश नक्कीच वाखाण्याजोगे आहेच परंतु नितिन भाईंसारखी लोक सुद्धा आहेत जे निरनिराळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकतात.
अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश विरकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,विद्यार्थ्याबाबत पालकांनी जागरूक असलं पाहिजे. कु.कलढोणे व माने यांनी मिळवलेलं यश हे एका दिवसाचं नसून त्यासाठी खूप परिश्रम घ्यावं लागते त्यासाठी पालकांनी दिशा ठरवली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात सुनील शिंदे, बाळासाहेब कलढोणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब कलढोणे म्हणाले की, माझ्या कन्येचा इयत्ता 5 वी मध्ये नवोदय परीक्षा व स्कॉलरशिप मध्ये नंबर लागल्यानंतर पहिला सत्कार नितिन दोशी यांनी घेतला होता व त्यावेळी त्ये म्हणाले होते की यापेक्षाही मोठा सत्कार घेण्याची संधी द्यावी , तिच जिद्द मनात ठेवून माझ्या कन्येने मनात जिद्द ठेवली आणि आज हे यश संपादन केले.या यशाचे श्रेय नितिन दोशी यांना जाते असेही ते म्हणाले आणि बोलता बोलता भावुक झाले त्यांना अश्रू अनावर झाले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक अजित मासाळ, रोहित लिंगे, श्री काळे,नितिन कलढोणे सौ.सुजाता माने,सौ.कलढोणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले. आभार मनोज शिंदे यांनी मानले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.