MIvs DC Match Preview: जिंका नाही तर घरी जा; प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला विजय हवाच


शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या सत्रात पहिल्या तीन लढतीत पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी आता प्लेऑफचा मार्ग खडतर झालाय. आतापर्यंत मुंबईने ११ पैकी ५ लढती जिंकल्या आहेत. त्याचे १० गुण असून ते गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहेत. प्ले ऑफमध्ये मधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना पुढील सर्व लढती जिंकाव्या लागणार आहेत.

उद्या (शनिवार) मुंबई इंडियन्सची लढत गुणतक्त्यात १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. दिल्लीचा गेल्या लढतीत पराभव झाला होता. गत विजेते मुंबई इंडियन्स यावेळी खराभ फॉर्ममध्ये आहेत. दुसऱ्या सत्रात सलग तीन लढती गमावल्यानंतर मुंबईने पहिला विजय मिळवला. आता हीच कामगिरी त्यांना कायम ठेवावी लागले.

दिल्लीने ८ विजय मिळून प्ले ऑफमधील स्थान जवळ जवळ निश्चित केले आहे. गेल्या हंगामात उपविजेते राहिलेल्या दिल्लीचा प्रयत्न गुणतक्त्यात पहिल्या दोन स्थानावर राहण्याचा असेल. ज्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळू शकतील.

मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात करुन दिली आहे. पण मधळ्या फळीतील फलंदाजांची कामगिरी खराब होत चालली आहे. गेल्या लढतीत कोलकाताविरुद्ध मुंबईने सहा विकेटनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात सौरभ तिवारीने ४५ तर हार्दिक पंड्याने ४० धावा केल्या होत्या. मुंबईसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागले. कायरन पोलार्डने ७ चेंडूत नाबाद १५ धावा करत फिनिशरची भूमिका पार पाडली होती. पण सूर्यकुमार यादव अद्याप फॉर्ममध्ये आलेला नाही. हा मोठा काळजीचा विजय असेल. इशान किशनला आणखी एक संधी मिळते का हे पाहावे लागले.

गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. पण फिरका गोलंदाज अद्याप विकेट शोधत आहेत. राहुल चाहर आणि क्रुणाल पंड्या यांच्यावर चांगली गोलंदाजी करण्याचा दबाव असले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: