sanjay raut met rahul gandhi : राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा, संजय राऊत का सांगत नाहीत?
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. लखीमपूर खिरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात एका स्थानिक पत्रकारासह एकूण ८ जणांचा मृत्यू झाले आहेत. प्रियांका गांधींना केलेली अटक आणि शेतकऱ्यांना भेटायला जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या रोखल्याप्रकरणी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. विरोधी पक्षांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असं राहुल गांधींची भेट घेण्यापूर्वी संजय राऊत म्हणाले. लखीमपूरची घटना लांछनास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं.
Lakhimpur Violence: माझ्या मुलाविरुद्ध पुरावा दाखवा, त्याक्षणी राजीनामा देईन : केंद्रीय मंत्री अजय मिश्र
लखीमपूर खिरीमधील हिंसाचाराच्या घटनेने देश हादरला आहे. प्रियांका गांधींना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना पीडित शेतकरी कुटुंबांना भेटण्यापासून रोखलं जात आहे. यामुळे यूपी सरकारच्या या कारवाईविरोधात संपूर्ण विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले.
bhupesh baghel : छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा लखनऊ विमानतळावर ठिय्या; ट्विट करून सांगितलं…