varun gandhi : वरुण गांधी भाजपला रामराम करणार? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
वरुण गांधी भाजपला रामराम करणार?
वरुण गांधींची बंडखोरी पाहता ते भाजपला रामराम करणार करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या ट्विटर प्रोफाईलचा स्क्रीनशॉट देखील व्हायरल झाला होता. यात त्यांनी ट्विटर बायोमधून भाजप हटवले होते. पण वरुण गांधींच्या जवळच्या मित्रांनी हे तर्क फेटाळून लावले आहेत. वरुण गांधींनी कधीच बायोमध्ये पक्षाचे नाव लिहिले नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
वरुणने लखीमपूर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले
लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेवरून वरुण गांधींनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे. वरुण गांधींची नाराजी लखीमपूर खिरी हिंसाचारापूर्वीही दिसून आली होती. वरुण गांधींनी ऊसाला ४०० रुपये दर जाहीर करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगींना पत्रही लिहिले होते. तसंच ५ सप्टेंबरला मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या महापंचायतीमध्ये वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन सरकारची गोची केली होती.
coal shortage : कोळसा मंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले, ‘…. पण राज्यांनी तसं केलं नाही’
वरुणच्या नाराजीचे कारण काय?
वरुण गांधी आणि आई मनेका गांधी यांच्याकडे पक्षाकडून सतत दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे ते पक्षाच्या भूमिके पलिकडे जाऊन वक्तव्य करत आहेत. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी वरुण गांधी यांच्या नावाचीही चर्चा होती. पण त्यांचा समावेश झाला नाही. याशिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या यूपी निवडणुकीत वरुण गांधींना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही, यामुळे वरुण गांधी नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं.