जागतिक टपाल दिन प्रत्येक दिवशी 9 ऑक्टोंबरला साजरा केला जातो. ई.स. 1874 मध्ये याच्या निर्मितीसाठी 9 ऑक्टोंबरला स्विसची राजधानी बर्न मध्ये युनिवर्सल पोस्टल युनियनची 22 देशांनी एकीकरण केले होते.
डिजिटल सुविधा येण्यापूर्वी पूर्वीच्या काळी टपाल हा मात्र पर्याय होता. टपालने संदेशांची देवाणघेवाण व्हायची. तसेच जर महत्वाचा संदेश असेल तर ट्रेलिग्राफ व्दारा पाठवण्यात यायचा.
जागतिक टपाल दिन इतिहास-
जागतिक टपाल दिनाचा इतिहास ई.स. 1840 पासून सुरु होतो. ज्यात ब्रिटनमध्ये सर रोलँड हिल ने एक नवीन व्यवस्था सुरु केली होती. जिथे पत्र तयार करण्यात यायचे. सांगितले जाते की, त्यांनी जगातील पहिली पोस्ट सेवा सुरु केली होती. याचे श्रेय सर रोलँड हिल यांना दिले जाते. या अंतर्गत त्यांनी हा देखील नियम बनवला की, स्थानीय सेवेच्या विशेष वजनाकरिता एक ठरवलेली रक्कम द्यावी लागेल.
जागतिक टपाल दिनाचे महत्त्व-
टपाल स्थापनेपासून, जागतिक टपाल दिनाचा वापर दळणवळण, व्यापार आणि विकासामध्ये टपाल सेवांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केला जातो. तसेच आज टपाल व्यवस्था ई-कॉमर्स, लॉजिस्टिक आणि आर्थिक समावेशनासाठी आवश्यक आहे.
भारतातील सर्वात मोठे टपाल ऑफिस-
भारतातील सर्वात उंच आणि मोठे टपाल ऑफिस हे हिमाचल प्रदेशामध्ये आहे. ज्याला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. तसेच भारतातील सर्वात मोठे सामान्य टपाल ऑफिस हे मुंबई मध्ये स्थित आहे. ज्याची स्थापना सन 1784 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी 9 ऑक्टोंबरला जागतिक टपाल दिवस साजरा करण्यात येतो.
तसेच सन 1766 मध्ये भारतात पहिल्यांदा टपाल व्यवस्था सुरुवात झाली होती तसेच कोलकत्ता मध्ये वारेन हेस्टिंग्स व्दारा वर्ष 1774 ला पहिल्यांदा टपाल स्थापन करण्यात आले होते. व भारतामध्ये 1852 ला पहिल्यांदा पत्रावर टपाल तिकीट लावण्याची सुरवात झाली होती. ज्यामध्ये एक ऑक्टोंबरला 1854 ला महाराणी व्हीकटोरीया यांचे चित्र असलेले तिकीट जारी करण्यात आले होते.
Edited By- Dhanashri Naik
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.