जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे ट्विट, दोषींना सोडले जाणार नाही

[ad_1]


पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दोषींना सोडले जाणार नाही. पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहा यांना जम्मू आणि काश्मीरला भेट देण्याचे निर्देश दिले आणि ते आता घटनास्थळी रवाना झाले आहे.

ALSO READ: Terror attack in Pahalgam अमित शहा यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, काश्मीरला भेट देणार

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदीं प्रथम गृहमंत्र्यांशी बोलले आणि त्यांना जम्मू आणि काश्मीरला जाण्यास सांगितले. अमित शहा देखील जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले आहे. पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून हल्लेखोरांना सोडले जाणार नाही असे म्हटले आहे.

 

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

https://platform.twitter.com/widgets.jsपंतप्रधान मोदींनी X वर लिहिले की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. बाधित लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल…त्यांना सोडले जाणार नाही!

 

पंतप्रधान मोदींनी लिहिले की, दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.

ALSO READ: Terror attack in Pahalgam बायसरनमध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला, अनेक जण जखमी

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top