lakhimpur kheri incident : लखीमपूरमध्ये काय घडलं नेमकं? व्हायरल व्हिडिओतील एका व्यक्तीने सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना घेण्यासाठी मी निघालो त्यावेळी आशिष मिश्रा मोनू (केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा) हे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक आशिष मिश्रा होते. थारमध्ये मी आणि इतर तीन जण होते. एक चालक आणि इतर दोन कार्यकर्ते होते, असं जयस्वालने सांगितलं.
थार ही कार हरी ओम मिश्रा चालवत होता. आंदोलकांनी हरी ओम मिश्राची हत्या केली, असं सुमित जयस्वाल म्हणाला. एका व्हायरल व्हिडीओमध्ये थार कार आंदोलकांना चिरडत जाताना दिसतेय, त्यावरही सुमितने उत्तर दिलं. कार आधी हळूहळू चालत होती. पण जेव्हा आंदोलकांनी लाठ्याकाठ्या मारायला सुरवात केली, त्यानंतर वेग वाढला होता. यामुळे असं झालं असेल. आमच्याकडे कोणतीही शस्त्रे नव्हती. मी भाग्यवान ठरलो आणि वाचलो, असं जयस्वालने सांगितलं.
lakhimpur kheri : अमित शहांना भेटले पंजाबचे मुख्यमंत्री; लखीमपूरप्रकरणी योगी सरकारने नेमली SIT
मी भाजपचा नगरसेवक आहे. मी निवडणूक जिंकली आहे. ज्या कारने काहींचा मृत्यू झाला, त्या कारमध्ये मी होतो. कारच्या चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. माझा मित्र शुभम मिश्राचीही आंदोलकांनी निर्घृण हत्या केली. दुसऱ्या, कारमध्ये असलेल्या इतर कार्यकर्त्यांचे काय झाले, मला माहित नाही. मी त्यांना चेहऱ्याने ओळखतो, त्याचे नावही माहित नाही. कसा तरी मी तिथून पळून गेलो, असं तो म्हणाला. ते लोक शेतकरी नव्हते. त्यांच्याकडे हत्यारं आणि लाठ्याकाठ्या होत्या. ते उपद्रवी होते, असं सुमितने सांगितलं.
lakhimpur kheri incident : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी CBI चौकशी व्हावी, सरन्यायाधीशांकडे मा
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तिकोनिया परिसरातील केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मूळ गावाला भेट देणार होते. याविरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी आंदोलकांना वाहनाने चिरडले आणि यानंतर हिंसाचार भडकला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी मिश्रा यांचा मुलगा आशिषसह एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.