वैष्णवी प्रसाद रानडे यांच्या संशोधनामुळे स्वयंचलित वाहन उद्योगात होणार क्रांती : रघुनाथ माशेलकर

रानडे यांच्या संशोधनामुळे स्वयंचलित वाहन उद्योगात होणार क्रांती : रघुनाथ माशेलकर

पंढरपूरच्या अभियंत्यांचे स्वयंचलित वाहन क्षेत्रात महत्वपुर्ण संशोधन

संशोधनाचे पेटेंट प्राप्त केल्याने पुणे येथे विशेष गौरव 

पंढरपुर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 एप्रिल – अभियंता वैष्णवीप्रसाद रानडे यांनी केलेल्या महत्वपुर्ण संशोधनामुळे स्वयंचलित वाहनांना अधिक सुरक्षा लाभणार असून वाहनांची क्षमता देखिल वाढणार आहे त्यामुळे स्वयंचलित वाहन क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे असे प्रतिपादन जेष्ठ शास्त्रज्ञ व भारतीय विज्ञान केंद्राचे अध्यक्ष पदि्वभुषण रघुनाथ माशेलकर यांनी केल.मुळचे पंढरपूरचे आणि सध्या मध्य रेल्वेत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले वैष्णवीप्रसाद रानडे यांनी स्वयंचलित वाहन क्षेत्रात महत्त्वपुर्ण संशोधन करुन त्याचे पेटेंट मिळविल्याबद्दल विज्ञान वारकरी मंचच्यावतीने त्यांचा उर्मिला शास्त्री विज्ञान वारकरी पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला त्यावेळी रघुनाथ माशेलकर बोलत होते.

मुंबई येथे मध्य रेल्वेत वरिष्ठ खंड अभियंता व सुरक्षा सल्लागार पदावर कार्यरत असलेले वैष्णवीप्रसाद रानडे यांनी निर्सगाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करुन उतारावर असताना वाहनाचे इंजिनाचा वापर थांबविण्याचे महत्वपुर्ण संशोधन केले आहे. या संशोधनामुळे स्वयंचलित वाहन उद्योगात मोठी क्रांती होणार असून उतारावर गरज नसताना गाडीचे इंजिन चालु राहते तसेच  वेग कमी करण्यासाठी ब्रेक, क्लज अथवा गियर कंट्रोल पध्दतीने वेग कमी करावा लागतो हे सर्व रानडे यांच्या संशोधनामुळे वाचणार असून या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वाहनाचे मायलेज वाढणार असून क्लजवरील ताण कमी झाल्याने क्लज प्लेटचे आयुष्यही वाढणार आहे.रानडे यांनी या संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेण्यासाठी व त्याचे पेटेंट स्वामित्व अधिकार मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या बौध्दीक संपदा विभागाकडे हे संशोधन दाखल केले. त्यानुसार दाखल झालेल्या सर्व संशोधनाची  छाननी करून त्यांना याचे पेंटेटही मिळाले आहे.

विविध संशोधन क्षेत्रात महत्वपुर्ण कार्य करणार्‍या काही निवडक पेटेंटची दखल घेऊन पुण्यात विज्ञान वारकरी एलएलपी आयपीआर अवेरअरनेस अँन्ड सायन्स टुरिझम या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते वैष्णवीप्रसाद रानडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

श्री.रानडे हे मुळचे पंढरपूरचे असून सध्या ते मुंबईत मध्य रेल्वेत सुरक्षा विभागात सुरक्षा सल्लागार या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी अ‍ॅाटोमोबाईल संदर्भात केलेल्या संशोधनामुळे वाहनांची सुरक्षा वाढेल. प्रदूषण कमी होऊन इंधनाची बचत होईल. स्वयंचलित वाहन क्षेत्रात क्रांती होईल असा त्यांना विश्वास आहे.

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात संशोधन केलेल्या संशोधकांचा ही गौरव करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे रविंद्र शास्त्री, रवींद्र बरोटे, लिना ठाकूर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत बोलताना श्री माशेलकर म्हणाले की, जेवढ्या जास्त पेटेंट ची नोंदणी होईल त्याप्रमाणात देशाच्या जिडीपी मधे वाढ होऊन अर्थ व्यवस्था मजबूत होते. रानडे यांच्या संशोधनामुळे स्वयंचलित वाहनांची सुरक्षा व क्षमता यामध्ये वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला.

15 वर्षाच्या परिश्रमाचे रुपांतर मोठया संशोधनात :रानडे
पंढरपूरचे सुपूत्र असलेले वैष्णवीप्रसाद रानडे म्हणाले शालेय जिवनापासून विज्ञान आधारीत विविध प्रयोग करण्याची आवड होती.गाडी चालविताना उतारावर असताना येणार्‍या अडचणी बाबतचे कुतूहल गप्प बसु देत नव्हते त्यामुळे या विषयावर काय करता येर्ईल यासाठी गेली 15 वर्षे संशोधन व चिंतन चालु होते.मात्र त्याला वैज्ञानिक कसोटीला आणून त्याचे रुपांतर वाहनात बसविण्यायोग्य उपकरण तयार करण्यात 15 वर्षांनी यश आले.या संशोधनाची दखल बौध्दीक संपदा विभागाने घेवुन त्याला मान्यता दिली व त्याचे पेटेंट देखिल या संशोधनाला मिळाल्यामुळे याची दखल जागतिक पातळीवरील सर्व वाहन उत्पादक कंपन्या घेतली व त्याचा वापर करुन इंधन वाचविणे व पर्यायाने हरित उर्जेला प्रोत्साहन मिळण्यात होणार आहे.श्री विठठ्लाची कृपा व सर्व मित्रमंडळींच्या शुभेच्छा यामुळेच आपण हे संशोधन जागतिक पातळीवर नेऊ शकलो असे प्रतिपादनही रानडे यांनी या प्रसंगी बोलताना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *