भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात मोठा बदल, आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूला संधी…
ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात आता बदल करण्याची तारीख आयसीसीने वाढवलेली आहे. आता १५ आक्टोबरपर्यंंत सर्व संघांना आपल्या संघात बदल करता येणार आहे. त्यामुळे आता याबाबतची अधिकृत माहिती बीसीसीआय १५ ऑक्टोबरला जाहीर करू शकते. त्यापूर्वी ज्या खेळाडूंना संधी द्यायची आहे, त्यांचा फिटनेस आणि कामगिरी पाहिली जाईल आणइ त्यानंतरच त्यांना युएईमध्ये आयपीएलनंतरही राहण्यास सांगितलं जाईल. त्यामुळे बीसीसीआयची निवड समिती आता विश्वचषकाच्या संघबांधणीसाठी पुढे सरसावलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत निवड समिती आपला संपूर्ण संघ तयार करून बीसीसीआयकडे खेळाडूंची यादी पाठवेल आणि त्यानंतर बीसीसीआय ती यादी जाहीर करेल. त्यामुळे आता भारताच्या विश्वचषकाच्या संघात अजून कोणत्या खेळाडूंचा समावेश करण्यात येऊ शकतो, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. पण त्यासाठी चाहत्यांना आता १५ ऑक्टोबरपर्यंतची वाट पाहावी लागेल.