amit shah : ‘पाकिस्तानने सुधरावं अन्यथा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक होईल’, अमित शहांचा जाहीर इशारा
संपूर्ण देश मनोहर पर्रिकर यांना दोन गोष्टींसाठी नेहमी लक्षात ठेवेल. त्यांनी गोव्याला ओळख दिली आणि दुसरे म्हणजे त्यांनी सैन्यातील तिन्ही दलांना वन रँक, वन पेन्शन दिले. गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात संरक्षण मंत्री बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. पूर्वी दहशतवादी देशाच्या सीमा ओलांडत होते. त्यांनी दहशतवाद पसरवला. दिल्लीतून एका निवेदनाशिवाय काहीही होत नव्हते. पण पुंछमध्ये हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सीमेशी छेडछाड करणं इतकं सोपं नाही, हे भारताने दाखवून दिलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
मोदी-पर्रीकर यांनी नव्या युगाची सुरवात केली. आता जशास ते उत्तर दिले जाईल. पाकिस्तानने कुरघोड्या थांबवल्या नाहीत आणि त्यांची पुनरावृत्ती केली तर सर्जिकल स्ट्राइकसाठी तयार राहावं, असा इशारा अमित शहांनी दिला.
jem commander terrorist sham sofi killed : जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर सोफी याचा खात्मा, काश्मीरम
उरी, पठाणकोट आणि गुरदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. २९ सप्टेंबर २०१६ ला झालेल्या उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता.