प्रतिमा स्थापित करीत असतांना विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू

[ad_1]


आंध्र प्रदेशातील एका गावात रविवारी पप्पाण्णा गौड यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या तयारीत असताना विजेचा धक्का लागून चार तरुणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश पोलिसांनी सांगितले की, रविवारी पप्पाण्णा गौड यांच्या पुतळ्याच्या अनावरणाची तयारी करत असताना चार तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अधिकारींनी सांगितले की, पुतळ्याच्या अनावरणाच्या तयारीदरम्यान पाच जणांना विजेचा धक्का लागला,परिणामी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक व्यक्ती रुग्णालयात दाखल आहे. मृतांचे मृतदेहपोस्टमोर्टमसाठी तानुकु येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Edited By- Dhanashri Naik

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top