अडानी देशाचा सर्वात गरीब माणूस म्हणत संजय राऊतांनी पीएम मोदींना टोला लगावला

[ad_1]

sanjay raut
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले असले तरी विरोधकांनी जोरदार टीका केली.निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.

ALSO READ: शिवसेना उद्धव गटाच्या खासदाराला बजेट आवडले, म्हणाले- हा मध्यमवर्गाचा विजय आहे
देशाच्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते. यावेळी ते म्हणाले होते की, त्यांना अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरात लक्ष्मी येईल. या वरुन संजय राऊतांनी टीका केली आहे. 

ALSO READ: देशाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे वक्तव्य
संजय राऊत म्हणाले, “आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी किंवा या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत जे काही योजना आखल्या आहेत, मग ते नोटाबंदी असो, जीएसटी असो, पंतप्रधान जेव्हा अशा घोषणा करतात, तेव्हा सर्वसामान्यांना त्रास होतो.हे सरकार गरीब आणि मध्यम वर्गासाठी नाही.

खासदार संजय राऊत यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “85 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणे म्हणजे अर्थव्यवस्था चांगली असल्याचे लक्षण नाही. ज्या प्रकारे रुपया डॉलरच्या तुलनेत 87 रुपयांवर पोहोचला आहे, ते चांगल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही.

ALSO READ: Budget 2025: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धन धान्य योजना जाहीर
ते पुढे म्हणाले, “आता देशात गरीब कोण आहेत? गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली असून गेल्या दहा वर्षांत मोदींचे मित्र गौतम अदानी यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. या देशात सध्या सर्वात गरीब व्यक्ती गौतम अडानी आहे. हे मोदी आणि अमित शहा यांचे मित्र आहे.  

देशाच्या आर्थिक योजना आणि अर्थसंकल्प लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी राबवले जातात, त्यामुळे गरिबांना ‘मोदींच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येत नाही’, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top