उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

निवडणूक होताच अभिजीत पाटलांनी लावला कामाचा सपाटा


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली शेतकऱ्यांसाठी ही मागणी

चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती मागणी, दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या सूचना

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.21/04/2024- लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साथ दिली होती. त्यामुळे या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी आणि विठ्ठलच्या सभासदांसाठी करण्याबाबतची भूमिका घेत शासन दरबारी विविध प्रश्न मांडण्यासाठी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पिण्याचे पाणी सोडून भीमा नदीकाठचा वीजपुरवठा किमान आठ तास करण्यात यावा ही पहिलीच मागणी करताच त्यावर तात्काळ दखल घेत वीज पुरवठा ८ तास करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले होते.

राज्यामध्ये गतवर्षी पाऊसमान अत्यल्प झाले होते .सध्या उन्हाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांसह नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी अहोरात्र मेहनत करून पिके जगविण्याचा प्रयत्न करत असताना तीव्र अशा या उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.सध्या भीमा नदीकाठचा वीज पुरवठा फक्त २ तासच असल्यामुळे पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके करपु लागलेली आहेत.यामुळे लागवडीचा खर्चही निघणार नसल्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

भिमा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या पाईपलाईन ह्या नदीपासून १५ ते २० हजार फुट अंतरावर असल्यामुळे कमी वेळेत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे जनावरांसाठीही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जर हा विद्युत पुरवठा २ तासाऐवजी ८ तास सुरू ठेवला तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय होऊ शकेल यासाठी वीज पुरवठ्याची वेळ वाढविणेबाबत वारंवार शेतकऱ्यांकडून मागणी होत होती.यामुळे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केली असता, त्यावर संबंधिताना आदेश देऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हा वीजपुरवठा मंगळवार पासून सुरू होणार असून यामुळे शेतकऱ्याची अडचण दूर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यावर्षी पाऊस चांगला होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.भिमा नदीत आलेले पाणी किमान २ महिने पुरेल पण लाईट नसेल तर पाणी असून काही फायदा शेतकर्‍याला होणार नाही.पाणी वाया जाईल व उभी पीके जळून जातील. त्यामुळे सध्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आपण हि मागणी केली होती. याची दखल उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी घेत पिण्याचे पाणी ठेऊन शेतीस लाईट सुरु करण्याच्या सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading