आषाढी वारीत १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी

आषाढी वारीत १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी ठरली जीवनदायी

१६ हजार ७१६ रुग्णांना १०८ ची मोफत रुग्णवाहिका सेवा

पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१२ :- नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी डायल १०८ च्या एकूण १२० रुग्णवाहिका कार्यरत होत्या.त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) कक्ष तयार करण्यात आले होते. त्याद्वारे पंढरपूरात आलेल्या भाविकांना २४ तास मोफत सेवा दिली गेली.यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते त्यामुळे मोबाईल नेटवर्कला अडथळे वारंवार येत असतात हा अनुभव असल्यामुळे या वर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी यासाठी वॉकीटॉकीची सुविधा सर्व रुग्णवाहिकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. पंढरपूरात अद्यावत असणारी कंट्रोल रुम वॉकीटॉकी सुविधा, जिओ मॅपींग या सर्व गोष्टीमुळे १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली.

आषाढी यात्रेत यावर्षी गंभीर स्वरुपाच्या १२४० रुग्णांना व किरकोळ आजार असणाऱ्या १५ हजार ४७६ रुग्णांना सेवा देण्यात आली.एकूण १६ हजार ७१६ रुग्णांना १०८ या मोफत रुग्णवाहिकेची सेवा देण्यात आली.

आषाढी यात्रेचा सांगता समारोप दि.११ जुलै २०२५ रोजी प्रांताधिकारी कार्यालय येथे करण्यात आला.वारीमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर ,पायलट व कंट्रोल रुममधील सर्व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून यथोचित सन्मान करण्यात आला.या समारंभास प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दीपक धोत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,आय सी यु इन्चार्ज डॉ.महेश सुडके, डॉ.प्रसन्न भातलवंडे,पुणे विभाग प्रतिनिधी – डॉ.प्रियांक जावळे,सातारा जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कदम,सांगली जिल्हा व्यवस्थापक कौस्तुभ घाटुळे,सोलापूर जिल्हा व्यवस्थापक अनिल काळे,विश्वजित भोसले तसेच सर्व एडीएम, इएमइसओ (डॉक्टर),पायलट या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top