kapil sibal : ‘पक्षात निर्णय कोण घेतंय हेच कळत नाहीए’, सिब्बल काँग्रेस हायकमांडवर बरसले
काँग्रेसचे अनेक चांगले नेते पक्ष सोडत असल्याच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पंजाबमधील संकटावर कार्यकारिणीच्या बैठकीची मागणी केली आहे.
पक्ष सोडून नेते का जात आहे? आपण कुठे चुकतोय? हे आपण पाहिलं पाहिजे. काँग्रसचं दुर्दैवं इतकं की जे पक्षाच्या नेतृत्वाजवळचे आहेत, तेच नेते सोडून गेलेत. जे आपले निकटवर्तीय नाहीत, ते अजूनही पक्षात आहेत, असं सिब्बल म्हणाले. कपिल सिब्बल यांचं हे वक्तव्य पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कलहादरम्यान आलं आहे. नवज्योत सिंग सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
काँग्रेसला हादरा! अमरिंदर सिंग अमित शहांच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल
कुठलाही अनुभव नसताना सोनिया गांधींनी कपिल सिब्बल यांना मंत्री केलं. पक्षातील प्रत्येकाचं ऐकलं जातं. यामुळे ज्या पक्षाने सिब्बल आणि इतर नेत्यांना ओळख दिली, त्यांनी पक्षाची बदनामी करू नये, असं काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले.
yogi adityanath : यूपीत पुन्हा कमळ फुलणार! आगामी निवडणुकीत भाजप ३२५ – ३५० जागा जिंकणार?
काही दिवसांपूर्वीच सुष्मिता देव आणि लुईझिन्हो फालेरो हे नेते पक्ष सोडून गेले. मी खरंच चिंतेत आहे. अशा नाराज नेत्यांच्या जवळ आपल्याला जायचं आहे. पण आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही, अशी व्यथा वरिष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मांडली.